Friday, May 1, 2026
Google search engine
HomePoliticsमनसे नवा वादळ अंदेवारांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा एकमुखी प्रवेश

मनसे नवा वादळ अंदेवारांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा एकमुखी प्रवेश

मनसे नवा वादळ अंदेवारांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा एकमुखी प्रवेश

राज ठाकरे यांच्या भूमिकेवर आणि अमन अंधेवारांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून चंद्रपूरमध्ये मनसेच्या ताकदीला नवसंजीवनी

AMC24 News.     संपादक अरविंद चाहादे

9405714165

चंद्रपूर | जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यात नवसंजीवनी आणणारा एक भव्य आणि ऐतिहासिक पक्ष प्रवेश सोहळा काल साक्षीला आला. पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या स्पष्ट, ठाम आणि जनतेच्या मनाला भिडणाऱ्या राजकारणावर विश्वास ठेवत तसेच मनसे कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अमन अंधेवार यांच्या झंझावाती नेतृत्वावर आणि तडफदार कार्यशैलीवर प्रभावित होऊन तब्बल २४ कार्यकर्त्यांनी मनसेच्या ध्वजाखाली प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा अंधेवार यांच्या चंद्रपूर कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला, ज्यामध्ये मनसेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

या पक्ष प्रवेशात विविध समाजघटक, व्यावसायिक, तरुण कार्यकर्ते, ग्रामीण भागातील नेते आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी व्यक्ती एकत्र आले. यामध्ये प्रशांत जुलमे, विनोद गुप्ता, नाविन कोतले, करण चेतूलवार, संतोष सोयाम, सुधीर झाडे, गणेश सोनेकर, गणेश गोखरे, राकेश सल्लम, नितेश खनके, मयूर पावडे, नयन पेदोर, गौरव येकलवार, अशोक कातकर, श्रावण गडपल्ली, अरविंद पेंदाने, सुरज केवळ, राधाकृष्ण भोंगा, रोशन चव्हाण, संपूरणणंद चव्हाण, अभिजीत पांडे, अरविंद चंदनखेडे, ओम बावणे आणि राकेश गाडी या २४ कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

या सर्वांनी मनसेच्या विचारधारेवर पूर्ण निष्ठा ठेवत, जिल्हा पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याची प्रतिज्ञा घेतली. या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मनसेची संघटनात्मक ताकद केवळ वाढणार नाही, तर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांवरही त्याचा ठोस परिणाम होणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागात मनसेचा झेंडा आता अधिक वेगाने फडकणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

अमन अंधेवार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “मनसे म्हणजे फक्त पक्ष नव्हे, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, स्थानिकांचा हक्क मिळवून देणारी आणि अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे. आज आमच्यात सामील झालेल्या कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे आमची ताकद अनेकपटीने वाढली आहे. येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक समाजघटकात मनसेचे अस्तित्व निर्माण करू.”

पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखी घोषणा देत, स्थानिक प्रश्नांवर कठोर भूमिका घेण्याचा संकल्प केला. रोजगार, स्थानिकांना प्राधान्य, उद्योगात स्थानिकांचा सहभाग, भ्रष्टाचाराविरोधी भूमिका आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध लढा या मुद्द्यांवर मनसे ठामपणे उभी राहणार असल्याचे ठरविण्यात आले.

हा प्रवेश फक्त संख्येचा आकडा वाढवणारा नव्हे, तर तळागाळातील लोकांचा विश्वास जिंकणारा टप्पा असल्याचे स्पष्ट झाले. या कार्यक्रमात जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, एकजूट आणि लढाऊ वृत्तीचे दर्शन घडले. स्थानिक राजकारणात बदलाची चाहूल लागल्याची भावना यानंतर स्पष्ट झाली आहे. मनसेच्या या झंझावाती प्रवेशामुळे चंद्रपूरच्या राजकीय पटावर नव्या समीकरणांची बीजे रोवली गेली असून, येत्या काळात त्याचा परिणाम निवडणुकीत ठळकपणे दिसेल, अशी शक्यता आहे.

ही घटना केवळ पक्षासाठी नाही, तर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरेल, याबद्दल शंका नाही. मनसेच्या झेंड्याखाली नव्या जोमाने आणि नव्या रक्ताने पुढील लढती अधिक तीव्र होतील, हे निश्चित.    

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular